eKYC करूनही या महिलांचा पत्ता होनार कट, कौटुंबिक उत्पादनाची अट
eKYC करूनही या महिलांचा पत्ता होनार कट कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींना आता ई-केवायसी बंधनकारक केली आहे. आणि ईकेवायसी करताना लाभार्थी महिला विवाहित असल्यास पती आणि अविवाहित असल्यास वडिलांची पण ई-केवायसी करायची आहे.
वडील किंवा पतीने वार्षिक उत्पन्न जर दीड लाखापेक्षा जास्त आसेल तरीही लाडक्या बहीणींचा हप्ता बंद करन्यात येउ शकतो.
लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने चारचाकी वाहने असलेल्यांची नावे वगळली. त्यानंतर एकाच रेशनकार्डवरील दोनपेक्षा जास्त लाभार्थी देखील कमी केले. याशिवाय वय कमी-अधिक असलेल्या महिलांसह केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही लाभ बंद केला आहे. त्यामुळे लाखो महिलांचा लाभ कायमचा थांबला आहे.
‘वार्षिक उत्पन्न’च्या निकषाची धास्ती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. मात्र, सुरवातीला निकषांकडे दुर्लक्ष करून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि आतापर्यंत लाभ देखील घेतला. मात्र, आता ई-केवायसीनंतर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. याची धास्ती लाडक्या बहिणींना आहे.