Aadhar mobile number update ; आधारशी लिंक मोबाईल नंबर बदला घरबसल्या मोबाईलवरुण

Aadhar mobile number update ; आधारशी लिंक मोबाईल नंबर बदला घरबसल्या मोबाईलवरुण

 

Aadhar mobile number update : आधार हे महत्त्वाचं कागदपत्र आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. परंतु अनेकदा मोबाईल नंबर बदलल्यानंतर किंवा गहाळ झाल्यास आधारशी लिंक असलेल्या मोबाईलनंबरवर ओटीपी येत नाही. त्यामुळे आधारशी निगडीत कामं पूर्ण होत नाहीत. यासाठी तुम्हाला आधी आधार केंद्रामध्ये जावं लागत होतं. परंतु आता ही सुविधा अतिशय सोपी होणार असून तुम्हाला घरबसल्या हे काम पूर्ण करता येणार आहे.

 

आधारला जोडलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता तुम्हाला कुठेही (आधार केंद्रात) जाण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून सुरू होईल.

 

ही सुविधा यूआयडीएआयद्वारे एका अॅपच्या माध्यमातून दिली जाईल. यात मोबाईल नंबर बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आपला आधार नंबर टाकून मोबाईल कॅमेऱ्यासमोर फेस ऑथेंटिकेशन करावं लागेल. यामुळे याची खात्री केली जाईल की जी व्यक्ती मोबाईल नंबर बदलत आहे, आधार कार्ड त्याच व्यक्तीच्या नावावर जारी करण्यात आलेलं आहे.

 

सध्या, यूआयडीएआय आधार कार्ड धारकांना अनेक सुविधा घरबसल्या पुरवत आहे, ज्यात त्यांना आधार केंद्रात जाण्याची गरज नाही. माय आधार पोर्टल आणि एम-आधार अॅपच्या माध्यमातून लोक घरबसल्या आपला पत्ता बदलू शकतात आणि आधारशी संबंधित कागदपत्रं अपडेट करू शकतात. कागदपत्रं अपडेट करण्याची प्रक्रिया निशुल्क आहे, तर पत्ता बदलण्यासाठी एक निश्चित शुल्क ऑनलाइन जमा करावं लागतं.

 

यासोबतच, आधारचं प्लास्टिक कार्ड ५० रुपये शुल्क भरून ऑनलाइन मागवता येतं, परंतु आता यूआयडीएआय मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधाही घरबसल्या देण्याच्या दिशेनं काम करत आहे. यूआयडीएआयनं अनेक सेवांसाठी फेस ऑथेंटिकेशनची सुविधा सुरू केली आहे. यामुळे आता ऑनलाइन चेहऱ्याची ओळख पटवून मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा घरबसल्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

असं सांगितलं जात आहे की, ही सुविधा यूआयडीएआयच्या स्तरावर अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होईल, ज्यावर काम सुरू आहे. ही सुविधा सुरू झाल्यानं लाखो लोकांना फायदा होईल, कारण सध्या मोबाईल नंबर बदलण्याचे अनेक अर्ज आहेत, ज्यासाठी लोकांना आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतात.

 

आधार नंबरला लिंक केलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी सध्या आधार केंद्रात जाणं आवश्यक आहे. तिथे मोबाईल नंबर बदलण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे बायोमेट्रिक डेटा म्हणजेच फिंगरप्रिंट घेतले जातात. याद्वारे हे पडताळलं जातं आणि खात्री केली जाते की मोबाईल नंबर बदलणारी व्यक्ती ही तीच व्यक्ती आहे ज्याच्या नावानं आधार क्रमांक जारी केला गेला आहे.

 

याची खात्री झाल्यानंतर मोबाईल नंबर बदलण्याची परवानगी दिली जाते. कारण जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीनं मोबाईल नंबर बदलला, तर आधारशी संबंधित सर्व नियंत्रण चुकीच्या व्यक्तीकडे जाईल, ज्यामुळे बँकिंगपासून इतर प्रकारच्या फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, व्यक्तीची पुष्टी करण्यासाठी आधार केंद्रावर येऊन बायोमेट्रिक डेटा देणं आवश्यक असतं.

Leave a Comment