पंजाब डख हवामान अंदाज ; या भागात होनार अतीव्रुष्टी, सतर्क रहा
पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यानचा सविस्तर हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. सुरुवातीला, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत ऊन, आणि रात्रीच्या वेळेस पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती यांसारख्या भागांत तसेच नांदेड, पुसद आणि वाशिम परिसरात आज रात्रीपासूनच पावसाची हजेरी राहील – पंजाब डख
या हवामान अंदाजातील मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा कालावधी 27 ते 30 सप्टेंबर दरम्यानचा आहे. या काळात राज्यात पावसाचा जोर खूप वाढणार आहे. हा पाऊस केवळ एका भागात मर्यादित न राहता, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खानदेश अशा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार सरी पडेल.
27,28, 29 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा तीव्र पाऊस होण्याची शक्यता पंजाब डख यांच्या कडून वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी या तीव्र पावसाच्या काळात सतर्क राहणे आवश्यक आहे. 27, 28 आणि 29 सप्टेंबरसाठी देण्यात आलेल्या या अतिवृष्टीच्या ‘अलर्ट’चे पालन करून, नदीकाठी किंवा धोकादायक ठिकाणी असलेले शेतीचे साहित्य आणि घरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घ्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळता येईल.
या तारखेनंतर पाऊस पुर्णपने उघडनार..
दिलासादायक बाब म्हणजे, 30 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाईल आणि 1 ऑक्टोबरला राज्यात पाऊस पूर्णपणे उघडेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस ओसरल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनसारखी पीके काढण्यासाठी चांगला संधी मिळेल, असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.