केंद्र सरकार अतीव्रुष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करनार, देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकार अतीव्रुष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करनार, देवेंद्र फडणवीस

 

अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकार लवकरच त्याचा अहवाल केंद्राला पाठविणार आहे. यानंतर केंद्राकडून मदतनिधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

 

यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले भरीव मदतीसाठीचे निवेदन सुद्धा पंतप्रधानांना देण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार ; भाजपने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार आपल्या शब्दावर कायम आहे. यासाठी समिती नेमण्यात आली असून, कर्जमाफी कधी आणि कशी द्यायची, याचा अभ्यास करीत आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. सरकार यावर काम करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment